Bengal Panchayat Election 2023: पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून या हिंसाचाराला सुरुवात झाली होती.
काय घडलं?
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात १२ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती
शनिवारी अधिकाऱ्यांनी दिली. या हिंसाचारात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आठ सदस्य, भाजप, माकप, काँग्रेस आणि इंडियन
सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) यांचा प्रत्येकी एक कार्यकर्ता ठार झाला. शुक्रवारी मध्यरात्रीपासून या हिंसाचाराला सुरुवात झाली.

आगामी लोकसभा निवडणुकीची ‘लिटमस चाचणी’ म्हणून विश्लेषक बंगालमधील या निवडणुकीकडे पाहत आहेत. शनिवारी
झालेल्या मतदानादरम्यान मतपेट्यांची चोरी, जाळपोळ आणि राजकीय कार्यकर्त्यांविरोधात जनक्षोभाचे दृश्यही पाहायला
मिळाले. मुर्शिदाबाद, नादिया आणि कूचबिहार जिल्ह्यांव्यतिरिक्त दक्षिण २४ परगणामधील भांगर आणि पूर्व मेदिनीपूरमधील नंदीग्राममध्ये हिंसाचार झाला आहे.

NCP Ajit Pawar : अजित पवार यांचा थेट शरद पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना इशारा,

राज्यातील ग्रामीण भागांतील ७३,८८७ जागांवर शनिवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, ५.६७ कोटी
मतदार जवळपास २.०६ लाख उमेदवारांचे भवितव्य ठरवतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारी तीन वाजेपर्यंत ५०.५२
टक्के मतदान झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात २२ जिल्ह्यांमध्ये ६३,२२९ ग्रामपंचायतींच्या जागा आणि ९,७३०
पंचायत समित्यांच्या जागा आहेत, तर २० जिल्ह्यांमध्ये ९२८ जिल्हा परिषदेच्या जागा आहेत.
२४ परगणा जिल्ह्यात रस्त्याच्या शेजारी टीएमसीचा बॅनर घेऊन बसलेल्या कार्यकर्त्याची पोलिसांनी पिटाई केली. तर पश्चिम
बंगालमधील सीताई येथे एका मतदान केंद्रावर मोडतोड करण्यात आलीय तिथे मतपत्रिका पळवून त्या पेटवून देण्यात आल्या.
या घटनेनंतर खूप वाद झाला.

कूचबिहारमधील फोलिमारी येथे हिंसाचार भडकला असून, तिथे भाजपाच्या पोलिंग एजंटची हत्या करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी हल्लेखोरांनी भाजपाचे पोलिंग एजंट माधव विश्वास याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका
ठिकाणी बॉम्बफेक करण्यात आली. त्यात सीपीआयएम उमेदवार अनिता अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम
बंगालमधील मतदानादरम्यान, आतापर्यंत ७ जणांची हत्या झाली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तृणमूलच्या ५ तर भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा समावेश आहे.
मालदा येथे बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजपाने त्यावरून तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे. तृणमूल
काँग्रेसकडून आपल्या कार्यकर्त्यांनमा लक्ष्य करण्यात येक आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *