Maharashtra Picnic point :महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठी धरणे असून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रात
अनेक महत्त्वाचे धरणे आहेत. प्रत्येक धरणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. जेव्हा ही धरणे ओव्हरफ्लो होतात तेव्हा अशा
धरणांच्या ठिकाणी फिरायला जाणे व त्या ठिकाणचे विहंगम दृश्य पाहून डोळे दीपतात.
धरणांच्या ठिकाणी असलेले निसर्ग सौंदर्य मनाला निरव शांतता देऊन जाते. जर तुमचा देखील या पावसाळ्यामध्ये काही
धरणांना भेट देण्याचा प्लान असेल तर तुम्ही या लेखात देण्यात आलेल्या पाच धरणांपैकी कुठेही जाऊन पर्यटनाचा आनंद
घेऊ शकतात. त्यामुळे या लेखात आपण महाराष्ट्रातील प्रमुख आणि महत्त्वाचे असे पाच धरणांची माहिती घेणार आहोत.

  • 1-जायकवाडी धरण– महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या पैठण या ठिकाणी जायकवाडी धरण असून
    मराठवाडा विभागातील जो काही दुष्काळग्रस्त भाग आहे त्या ठिकाणच्या शेत जमिनीला सिंचन सुविधेच्या
    दृष्टिकोनातून जायकवाडी धरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या ठिकाणी एक विद्युत प्रकल्प देखील
    आहे.पावसाळ्यामध्ये जेव्हा हे धरण पूर्ण क्षमतेने भरते तेव्हा या ठिकाणाचा देखावा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो.

2- ईसापुर धरण– हे धरण देखील महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचे धरण असून हे पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले धरण आहे.
या धरणाचा फायदा हा हिंगोली तसेच यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात झालेला असून या धरणाचा
जलसाठा देखील सर्वात मोठा आहे. या धरणाची उंची साधारणपणे 57 मीटर इतकी आहे.

Maharashtra
Picnic point

  • 3- उजनी धरण– हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धरण असून इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी या दोन
    शहरांच्या मध्ये भीमा नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणाची उंची 56.4 मीटर आणि लांबी ८३१४ फुट
    इतकी आहे. या धरणावर वीज निर्मिती प्रकल्पापासून त्या प्रकल्पाची क्षमता 12 वॅट इतकी आहे.धरणाच्या आजूबाजूचा
    परिसर हा निसर्गरम्य असून पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी हे धरण एक चांगला पॉईंट आह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *