Samrudhi Mahamarg
Accident: नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा – सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25
प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस
दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य
शासनानं तज्ञांच्या सल्ल्यानं यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत
मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील
जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो. समृद्धी महामार्गावर
सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी
महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं
उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा
गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

Samrudhi Mahamarg Accident

दुर्देवी अपघातानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शरद पवार, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड,
सुप्रिया सुळे, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या इतर नेत्यांनी यावर सरकारला घेरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन
गडकरी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी नेत्यांनी या दुर्दैवी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे



https://loksabhanews2024.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *